Daily News

नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस, अजून एवढ्या कोसळणार

नाशिक जिल्ह्यात पावसाने उडविली दैना, अजून एवढ्या कोसळणार

business batmya / business News / बिझनेस बातम्या

नांदगाव, ता. 19 आॅक्टोबर 2024-  पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती पुढील २ दिवसांमध्ये भारताच्या किनाऱ्यापासून दूर पूर्व-वायव्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही भागात पुढील २ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागने दिला. सलग चार पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे.

नाशिक जिल्हा झोडपलं

(मुक्ताराम बागुल) :–नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाट पूर्व भागात असलेल्या बोलठाण व बोलठाण परिसरात दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका, व कापूस पिकाचे नुकसान होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरातील जातेगाव,ढेकु, रोहिले बुद्रुक, गोंडेगाव, जवळकी, कुसुमतेल, लोंढरे गावात व परिसरामध्ये तीन दिवसापासून उघडझाप पाऊस होत असल्याने. सध्या मक्याचे पीक संघटनेचे काम सुरू आहे.

तसेच कापूस वेचणी योग्य झाला आहे. परंतु उघडझाप पाऊस होत असल्यामुळे या पिकाचे नुकसान होत आहे. त्यातच दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून विजांच्या गडगडात सह रिमझिम पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

जर रात्रभर पाऊस सुरूच असला तर कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. मका पिकाची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

( एकनाथ भालेराव ) आता नाशिक जिल्ह्या सह येवला तालुक्यात परतीच्या पावसाने वाहून जातो कि काय अशी भयानक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तवला आहे. ढगाच्या गडगडात सह विजाच्या कडकडात सह येवला तालुका पावसाने झोडपून काढला आहे.

चांदवड, देवळा, निफाड सर्व तालुक्यात रात्री पावसाची आदळ आपट सुरु होती. अनेक शेतामध्ये पाणीचं पाणी असून वादळी पावसाने मका पिक आडवे केले आहे. तर कांदा पिकामध्ये सतत पाणी साचल्याने कांदा पिक खराब झाले आहे. कांदा पिकावर रोगाचा प्रार्दभाव झाल्याने शेतकरी संकाटात सापडला आहे.  नाशिक जिल्ह्यात काढणीला आलेले पीक गमवण्याची वेळ परतीच्या पावसाने शेतकऱ्यांन वर आणली आहे.

मनमाड ( अविनाश पारखे )  पाऊस आला लाईट गुल, अजब कारभार महावितरणचा

यामुळे व्यापारी खूप त्रस्त झाले आहे.मनमाड शहर हे कामगार वस्तीचे गांव. संध्याकाळी गावा मध्ये थोडी फार गर्दी वाढते. आणि लाईट गुल होतात त्यामुळे ग्राहक हा निघून जातो,त्यामुळे व्यापारी हा खूप त्रस्त झाला आहे.
ऐन सणासुदीला बाजार पेठ अंधारात…
राजाभाऊ पारीख, व्यापारी

(अतुल सुर्य़वंशी ) बागलाण तालुक्यात विजाच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसन्यास सुरुवात काढणीस सुरुवात झालेल्या मका पीकासह उन्हाळी कांदा रोपाचे मोठ्या प्रमानात नुकसान होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!