उद्योग / व्यवसाय

ऑक्टोबरमध्येही तरुणांना कोणी देईना काम आणि दाम..

business batmya

सप्टेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर 6.43 टक्के होता. त्यानंतर एकाच महिन्यात या दरात एका टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. ग्रामीण भागात बेरोजगारीची (Rural Unemployment Rate) समस्या सर्वाधिक असल्याचे आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.

खरीपानंतर देशात बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात देशातली बेरोजदारीचा वृद्धी दर जास्त होता. ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा (Unemployment) दर 7.77 टक्क्यांवर पोहचला. सप्टेंबर महिन्यात हा दर गेल्या चार वर्षांत सर्वात कमी स्तरावर होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) अनुसार हे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर सप्टेंबर महिन्यात 5.84 टक्के होता. ऑक्टोबर महिन्यात या दरात भयानक वाढ झाली. हा दर ऑक्टोबर महिन्यात 8.04 टक्क्यांवर गेला. त्यामुळे सरकारला ग्रामीण भागात रोजगार पुरविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढला नाही तर कमी झाला. शहरी भागातील बेरोजगारीचा दर 7.21 टक्क्यांहून 7.7 टक्क्यांवर आला. शहरी भागात अनेक अनेक लघु उद्योगांमध्ये वाढ झाल्याने तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

खरीप पीक साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हाती येते.या सहा महिन्यात अनेक प्रकारची कामे ग्रामीण भागात सुरु असतात. त्यामुळे बेरोजागारीचा आकडा कमी असतो. पण यंदा पावासाने दाणादाण उडवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!